You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबईः मॉल्स एका दिवसांत का बंद झाले?
15 ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामध्ये मॉल्सही सुरू करण्यात आले. पण दोनच दिवसांत हे मॉल्स बंद करण्याची वेळ शॉपिंग सेंटर असोसिएशनवर आली आली.
मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत अशी अट राज्यसरकारने 16 ऑगस्टला काढलेल्या सुधारित आदेशामध्ये घातली.
मॉलमध्ये काम करणाऱ्या बर्याच कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नसल्याचं शॉपिंग सेंटर असोसिएशनने म्हटलं आणि सुरू झालेले मॉल्स दोन दिवसांत बंद झाले आहेत.
शॉपिंग सेंटर असोसिएशनच्या अंतर्गत येणारे राज्यातले 50 मॉल्स बंद करण्यात आले आहेत.
काय आहेत सरकारचे आदेश?
कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी घट झाल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारकडे होत होती.
11 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकल ट्रेनसह मॉल्स, रेस्टॉरंट 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला.
15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश मिळेल अशी अट घातली गेली.
त्यानंतर 18 वर्षांखालील मुलांना ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाईल असा सुधारित आदेश काढण्यात आला.
मॉल्स सुरू होऊन एक दिवस झाल्यानंतर 16 ऑगस्टला राज्य सरकारने पुन्हा सुधारित आदेश काढत मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत अशी अट घालण्यात आली.
अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस झाले नसल्यामुळे मॉल्स बंद करण्याचा निर्णय शॉपिंग सेंटर असोसिएशनने 17 ऑगस्टला जाहीर केला.
शॉपिंग सेंटर असोसिएशनचं काय म्हणणं आहे?
राज्य सरकारने मॉल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन लसीचे डोस घेणं अनिवार्य केल्यानंतर शॉपिंग सेंटर असोसिएशनने कर्मचारी नसल्यामुळे मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला. या अटीमुळे महिनाभर तरी मॉल्स सुरू करणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटले. यावेळी काढलेल्या परिपत्रकात त्यांनी म्हटले,
- मॉल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 80% कर्मचारी 18 ते 44 वयोगटात मोडतात. बरेचसे कर्मचारी हे कर्मचारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. पण त्यांनी लसीचा पहीला डोस घेतलेला आहे.
- महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण 1 मे पासून सुरू करण्यात आलं. त्यानंतर राज्यात लसीचा मोठा तुटवडा जाणवू लागला. मग 12 दिवसांनंतर 18-44 वयोगटातील लसीकरण काहीकाळ थांबवण्यात आले.
- 18 वर्षांवरील लसीकरण हे 21 जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने कोव्हीशील्डच्या लसीच्या दोन डोसमधलं अंतर 12-16 आठवड्यांनी वाढवण्यात आलं.
कोरोना काळात मॉल्स 247-345 दिवस बंद होते. मॉल्सचा आणि तिथल्या दुकानदारांचं प्रचंड मोठं नुकसान झाले आहे. ते इतक्यात भरून निघणं अशक्य आहे.
त्यात राज्य सरकारने लसीच्या दोन डोसची अट फक्त मॉल्समधल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, 'मॉल्सवर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
एक लसीचा डोस घेतलेल्या कर्मचार्यांनाही काम करू द्यावं. राज्य सरकारने ही अट शिथिल करावी' .
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)