संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याची काँग्रेसची टीका

संसद

फोटो स्रोत, MONTEY SHARMA

संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे रद्द करण्यात आले असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केलं आहे.

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून याबाबत कळवलं आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच पक्षांना वाटत आहे की संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात यावे. थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा करण्यात आली नव्हती असा खुलासा काँग्रेसने केला आहे.

कोरोना
लाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि थोड्याच दिवसात लस येण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करता येऊ शकते असं जोशी यांनी पत्रात म्हटलं आहे.

मी विविध पक्षांच्या नेत्यांशी अनौपचारिकरीत्या चर्चा केली. त्यात कळलं की अनेक नेत्यांनी कोरोनाबाबतची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने हे अधिवेशन रद्द करण्यात येत आहे असं जोशी लिहितात.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की प्रल्हाद जोशींनी राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्यासोबत याबाबत चर्चा केली नव्हती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"स्पर्धा परीक्षा कोरोना काळात आयोजित करण्यात आल्या. अनेक राज्यात शाळाही सुरू झाल्या आहेत. विद्यापीठांद्वारे परीक्षांचं आयोजन केलं जात आहे. बिहार आणि बंगालमध्ये रॅलीज घेतल्या जात आहेत. पण संसदेचं हिवाळी अधिवेशन घेता येत नाही. असं का? देशात लोकशाही असल्याचं हे लक्षण आहे का?", असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

"शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा करण्याऐवजी सरकारने या मुद्यापासून पळ काढला आहे. कोरोनाच्या नावाखाली संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं. मात्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढायचा नसल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे", असं आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)