नव्या शालेय अभ्यासक्रमात कोणते बदल होतील आणि तज्ज्ञांचं मत काय?

शिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात (NCF) अनेक बदल सूचवले आहेत.

शालेय शिक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक मसुद्यात माध्यमिक शिक्षणात बहुविध विषयांचं शिक्षण, एका वर्षात दोनदा बोर्डाच्या परीक्षा आणि 12 वीच्या इयत्तेत सेमिस्टर प्रणाली लागू करण्याचे मुख्य प्रस्ताव आहेत.

या मसुद्यात वर्गात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था, कपडे, भाषा आणि संस्कृतीशी संबंधित इतर विषयांवरही प्रस्ताव देण्यात आलेत.

गोलाकार आणि अर्ध गोलाकार आकारासारखी वर्गाची रचना ठेवण्याचाही प्रस्ताव आहे.

त्याचसोबत, शाळेत होणाऱ्या संमेलनांना तांत्रिक करण्याऐवजी अधिक अर्थपूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय.

यासोबतच स्थानिक हवामानानुसार पारंपारिक, आधुनिक किंवा जेंडर न्यूट्रल गणवेशाचा पर्याय शाळांनी निवडण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या मसुद्यात मुलांच्या पंचकोश (फाईव्ह फोल्ड) विकासावर भर देण्यात आला असून संतुलित आहार, पारंपारिक खेळ, योगासने यांद्वारे मुलांच्या नैतिक विकासावर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आपली संस्कृती समजून घेण्यासाठी विविध प्रकारच्या कथा, गाणी, कविता आणि प्रार्थना शिकवण्यासही सांगितले आहे.

या मसुद्याचा दुसऱ्या टप्प्यात चार इयत्तांबद्दल तरतुदी आहेत, ज्यात 9वी, 10वी, 11वी आणि 12वी इयत्तांचा समावेश आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुलांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून विषय निवडण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे.

10 वी उत्तीर्ण होण्यासाठी मुलांना ह्युमॅनिटी, मॅथेमॅटिक्स-कॉम्प्युटिंग, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विषयांचे दोन अभ्यासक्रम घ्यावे लागतील म्हणजेच 9वी आणि 10वी या दोन वर्षांत 16 अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील.

तर 11 वी आणि 12 वीमध्ये विद्यार्थ्यांना यामधून निवडलेले कोर्स दिले जातील.

त्याचबरोबर या मसुद्यानुसार अकरावी आणि बारावीमध्ये वर्षअखेरीस एका परीक्षेऐवजी मॉड्युलर बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा आणि दोन्ही सेमिस्टरचे गुण एकत्र करून मूल्यमापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

628 पानांच्या या मसुद्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक आणि तज्ज्ञांकडून मते मागवण्यात आली आहेत.

NCF हा नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कचा मुख्य भाग आहे. काही जाणकारांना वाटतं की, शालेय शिक्षण प्रणालीला सकारात्मकदृष्टीने एनईपीला अनुसरून तयार करावं, जेणेकरून मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देता येईल.

दुसरीकडे, एका बाजूचे म्हणणे आहे की, एनसीएफ मार्गदर्शक असू असावं, सूचना देणारा नसावं.

शिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक अनिता रामपाल

दिल्ली विद्यापीठातील शिक्षण विद्याशाखेच्या माजी प्रोफेसर अनिता रामपाल यांच्या मते, हा केंद्राने जारी केलेला तपशीलवार दस्तऐवज आहे आणि इतक्या तपशीलात जाण्याची गरज नव्हती.

यापूर्वी अभ्यासक्रमाची चौकट अशी नव्हती. हे एखाद्या आदेशासारखं दिसतं, अभ्यासक्रम तयार करणाऱ्या तज्ञांना किंवा शिक्षकांसाठी ते मार्गदर्शक असायला हवं होतं.

संमेलन किती काळ असेल, गणवेश काय असेल किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम काय असेल, हे सर्व राज्यांवर सोडले पाहिजे. कारण संघराज्यीय रचनेत राज्ये त्यांच्या संदर्भानुसार अभ्यासक्रमाबाबत चर्चा करतात, बनवतात आणि बदलतात. यासोबतच अनेक संस्था अभ्यासक्रम तयार करण्याचे कामही करतात.

वास्तविक NCF अभ्यासक्रमात घटनात्मक मूल्ये, शैक्षणिक मूल्य आणि विचार याविषयी मार्गदर्शन करते, पण राज्ये स्वतःचा अभ्यासक्रम तयार करतात. यानंतर केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (CABE) सर्व राज्यांच्या संमतीनंतर त्यास मान्यता देते, जे मार्गदर्शक फ्रेमवर्क म्हणून वापरले जाते.

शिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे, NCERT सुद्धा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर काम करते, अशा परिस्थितीत ही चिंतेची बाब ठरू शकते.

त्याचबरोबर 9वी आणि 10वीचे विषय आठ क्षेत्रांमध्ये निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी दोन अभ्यासक्रम घ्यावे लागतील, जे एकूण 16 अभ्यासक्रम होतील. असे दिसते की मुलांना अनेक पर्याय दिले आहेत, परंतु प्रत्येक शाळेत मुलांना हे अभ्यासक्रम निवडता येतील का, ते विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होतील का?

तसेच, 16 अभ्यासक्रमांची चर्चा आहे, त्यामुळे 9वी आणि 10वीमध्ये मुले या अभ्यासक्रमांमध्ये किती सखोल अभ्यास करू शकतील, त्यांची समज किती विकसित होईल?

दिल्लीबद्दलच बोलायचे झाले तर एक तृतीयांश शाळांमध्ये विज्ञान हा विषय दिला जात नाही. अशा परिस्थितीत दहावीनंतर विद्यार्थ्यांनी नवीन विषय निवडले तर काय होईल?

उदाहरणार्थ, सामान्य विज्ञान हे दहावीपर्यंत शिकवले जाते, जे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे एकात्मिक स्वरूप असले पाहिजे, परंतु सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात विविध विषयांचे धडे असल्याचे दिसून येते, जे शिकवण्यास शिक्षक कचरतात.

अशा परिस्थितीत शिक्षकांना अशा प्रकारे वर्ग घेता येतील, अशी व्यवस्था करावी लागेल.

दुसरीकडे, व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार केला तर अशा मुलांना तुम्ही पुढे कसे घेऊन जाल, ते काय अभ्यास करतील आणि ते काय बनतील? आणि कॉलेजमध्ये या अभ्यासक्रमांचे शिक्षण कसे घ्याल?

जे. एस. राजपूत

NCERT माजी अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ जेएस राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, शैक्षणिक धोरणात जे काही सांगण्यात आले आहे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाईल, हे एनसीएफमध्ये सांगण्यात आले आहे.

यामध्ये शिकण्यावर अधिक भर देण्यात आला आहे, तर शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमधील भेद दूर करण्यात आला आहे आणि कौशल्य विकास प्रत्येकासाठी आवश्यक करण्यात आला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे.

महात्मा गांधी म्हणाले होते की, प्रत्येकाला हाताने कसे काम करावे हे माहित असले पाहिजे, आज त्याचे स्वरूप बदलले आहे. परंतु आत्मा तोच आहे जो NCF मध्ये दिसून येतो.

NCF च्या या मसुद्यात वर्ग कसे असावेत इत्यादी या सर्व गोष्टी समोर एकच ध्येय ठेवतात, ते म्हणजे शाळेचे वातावरण असे असावे की, मुलांना सकाळी उठल्यावर शाळेत जावेसे वाटेल.

शिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

जगात ज्या देशांनी ही प्रगती केली आहे, त्या देशांनीच प्रगती केल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत या अभ्यासक्रमानंतर अभ्यासक्रम कधी तयार होणार, याची मोठी भूमिका असेल.

याचा संदर्भ शिक्षक आणि शिक्षणाचा देखील आहे. कारण शिक्षक पूर्णपणे तयार, समर्पित नसतील आणि त्यांना आचरण, कसे जगावे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे माहित असेल, तेव्हा अभ्यासक्रम कितीही चांगला असो, तो योग्यरित्या अंमलात आणला जाऊ शकत नाही.

सुरुवातीच्या काळात मुले अनेक भाषा शिकू शकतात, अशा स्थितीत बहुभाषिकतेची चर्चा अगदी बरोबर आहे. जेणेकरून भविष्यात त्यांना त्याचा फायदा मिळू शकेल.

तर 9 वी आणि 10 वीमध्ये आठ क्षेत्रांबद्दल आराखड्यात बोलण्यात आले आहे, त्यापैकी विद्यार्थ्यांना दोन अभ्यासक्रम घ्यावे लागतील, नंतर अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित, वाणिज्य किंवा अर्थशास्त्र किंवा इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र आणि इतिहास अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला होता. पण यांचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणताही विषय स्वतंत्रपणे एकटा पुढे जाऊ शकत नाही. त्यांना अनेक जोडलेले संदर्भ असतात.

उदाहरणार्थ, आईनस्टाईन म्हणाले होते की जर मला अभ्यासक्रम बनवण्याचा अधिकार दिला गेला तर मी मुलांचे शिक्षण संगीत आणि गणित या दोनच विषयांनी सुरू करेन. कारण यामुळेच मुलं विकसित होतील आणि जगातील सर्व विषय शिकत जातील.

या अभ्यासक्रमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित आहे. कालांतराने याचे फायदे लक्षात येतील.

यासोबतच विद्यार्थी त्यांच्यातील गुण आणि आवडीनुसार विषय निवडू शकतो.

जेव्हा विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन दिले जाते, तेव्हा त्यांच्यामध्ये आणखी दोन गोष्टी वाढतात – कुतूहल आणि सर्जनशीलता.

मला या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पानावर या चार गोष्टी दिसतात आणि त्याची खरोखर अंमलबजावणी झाली तर नक्कीच संशोधनाचा दर्जा वाढेल आणि खूप नावीन्य येईल.

विद्यार्थ्यांचे विचार बोथट केले नाहीत, तर तो नक्कीच नवा विचार करेल आणि त्यातून समाजात नाविन्य निर्माण होईल.

जगात तोच समाज पुढे जातील, जे ज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या बौद्धिक क्षमतांना चालना देतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)