IAF कारवाई : प्रत्युत्तर देणं ही आमची मजबुरी होती - इम्रान खान

भारत-पाकिस्तान संघर्ष आता चिघळण्याची चिन्हं आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा भारताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रतिकारात 2 भारतीय वैमानिकांना पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर भारतानं एक वैमानिक बेपत्ता असल्याचं सांगितलं आहे.
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी आज नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून भारतीय हवाई क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला, असा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच भारताच्या दोन विमानांना पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधल्या बालाकोट इथे 26 फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला. या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची संधी आम्ही राखून ठेवतो, असं पाकिस्तानने म्हटलं होतं. त्यामुळे आज सकाळी झालेल्या या प्रतिहल्ल्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव तसंच सीमेवर तणाव वाढला आहे.
पाहूया आज सकाळी काय काय झालं:


यातील काही वृत्त वेगवेगळ्या वृत्तसंस्थांच्या हवाल्यानं देण्यात आली आहेत. बीबीसीनं त्यांची वैधता तपासून पाहिलेली नाही.
संध्याकाळी 6 - लष्कराच्या शौर्याचं राजकारण नको - राहुल गांधी
या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी लष्कराच्या शौर्याचं भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याचा सर्वपक्षीय बैठकीत निषेध करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर अतुलनीय शौर्याचं प्रतीक आहे. बुधवारी पाकिस्तानच्या आक्रमणाला उत्तर देताना आपला एक वैमानिक बेपत्ता झाला आहे. आपला वैमानिक सुखरुप परतेल अशी खात्री आहे. या अवघड काळात भारतीय लष्कराच्या आम्ही भक्कमपणे पाठिशी आहोत. पुलवामा हल्ल्यात आपल्या सैनिकांनी जीव गमावले. त्यांच्या शौर्याचा, बलिदानाचा राजकारणासाठी उपयोग करून घेणं दुर्देवी आहे. त्याप्रती बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय वायू सेनेनं दाखवलेलं धाडस सर्वोच्च दर्जाचं आहे."
दुपारी 4 - इम्रान खान यांचा चर्चेचा प्रस्ताव
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
ते म्हणाले "आज मी भारताशी बोलणार आहे. आता आपण विचार करून कृती करायला हवी. पहिलं महायुद्ध काही महिन्यांत संपेल असं वाटलं होतं, पण ते अनेक वर्षं चाललं. अमेरिकेला वाटलं नव्हतं की दहशतवादाविरोधातला लढा 17 वर्षं चालेल. मी भारताला म्हणतो की वेळेची अशी गणितं चुकली तर आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल. युद्ध सुरू झालं तर ते थांबवणं माझ्या हातात नसेल आणि मोदींच्याही हातात नसेल. पुलवामानंतर जर भारताला दहशतवादावर चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत."
दुपारी 2.00 वाजता - पाकिस्तानने भारतीय वैमानिकाला पकडलं?
दरम्यान, एका भारतीय वैमानिकाला पकडल्याचा दावा करणारं एक ट्वीट पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केला होतं.

फोटो स्रोत, Twitter @MOIB_Official
भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन (Service# 27981) हे पाकिस्तानी वायुदलाच्या ताब्यात असल्याचं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं होतं. पण काही वेळाने हे ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे.

दुपारी 1.15 वाजता - पाकिस्तानचा शांततेचा प्रस्ताव
"आज आम्ही स्वसंरक्षणात हल्ले केले आहेत. जर आमच्यावर युद्ध लादलं गेलं तर तो आमचा नाइलाज असेल," असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणत भारतपुढे शांततेचा प्रस्ताव मांडला आहे.
"जंग मे किसी की जीत नही होती किसी की हार नही होती सिर्फ इंसानियत की हार होती है. आम्हाला युद्ध नकोय. दोन्हीकडच्या लोकांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांच्या वतीने शांततेने चर्चेचा प्रस्ताव भारतापुढे मांडत आहोत. युद्ध झालं तर फक्त दोन देशच नाही तर या संपूर्ण भागात आणि जगभरात परिणाम होतील. त्यावर ते कसा विचार करतात यावर पुढची वाटचाल अवलंबून आहे," असं त्यांनी संगितलं.

फोटो स्रोत, YouTube Screengrab
सकाळी झालेल्या हवाई घुसखोरीबद्दल बोलताना ते म्हणाले, "दोन भारतीय विमानं पाकिस्तान हद्दीत घुसली आणि त्यांना आम्ही पाडलं. एक विमान भारतीय हद्दीत पडलं तर एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. एक भारतीय वैमानिक जखमी आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे," असं पाकिस्तानच्या गफूर म्हणाले.
या घटनेला पुरावा म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रांचे फोटो दाखवले.

दुपारी 1 वाजता - '...तर भारताला मोठी किंमत मोजावी लागेल' - तालिबान
भारत-पाकिस्तानमधल्या वाढत्या संघर्षाची मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते, असा इशारा तालिबानच्या प्रवक्त्यांनी दिला आहे.
"भारताने पाकिस्तानात हिंसाचार वाढवला तर त्यामुळे अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि एकंदरच या भागातील शांतता धोक्यात येऊ शकते. असा संघर्ष रेटून धरण्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते," असं तालिबानचे प्रवक्ते झबिउल्लाह मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
अफगाणिस्तानात 17 वर्षं चाललेलं युद्ध संपुष्टात आणण्यासाठी सध्या आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर शांतता चर्चा करत आहोत, असंही तालिबानने म्हटलं आहे.

दुपारी 12.50 - पाकिस्ताननेही केली विमानतळं बंद
दरम्यान, पाकिस्ताननेही लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळांवरची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दरम्यान, एअर विस्तारा आपल्या श्रीनगर, लेह आणि जम्मूला जाणाऱ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत तर गो एअरने काही काळासाठी उड्डाणं स्थगित केली आहेत.

दुपारी 12.45 - भारताने केली काही विमानतळं बंद
मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या अपघातानंतर श्रीनगर, लेह आणि जम्मूसह पाच विमानतळांवरून प्रवासी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या श्रीनगरस्थित एका अधिकाऱ्याने PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पण ही आपत्कालीन परिस्थिती नेमकी काय, हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. पण बडगाम जिल्ह्यातील अपघातानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
श्रीनगर, लेह आणि जम्मू विमानतळांवरील काही विमानं त्यांच्या उड्डाणाच्या ठिकाणी वळवण्यात आली आहे, असंही या अधिकाऱ्यांनी सागितलं.
याशिवाय, चंदिगड आणि अमृतसर विमानतळंसुद्धा बंद करण्यात आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. पण चंदिगढ विमानतळावर "सध्या तरी वाहतूक सुरळीत" असल्याची माहिती बीबीसी पंजाबीला मिळाली आहे.

दुपारी 12.01 - भारतीय हेलिकॉप्टरला मध्य काश्मीरमध्ये अपघात
दरम्यान, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात एका भारतीय हेलिकॉप्टरचा आपघात झालेला आहे. यात दोन पायलट्सचा मृत्यू झाला आहे.
गारेंड कलान गावात सकाळी 10.05 वाजता हा अपघात झाल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
या हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले आणि त्याने पेट घेतला, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सकाळी 11.55- 'पाकिस्तानने पाडली दोन भारतीय विमानं'
"पाकिस्तानी एअर फोर्सने आज सकाळी केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषेचं (LoC) उल्लंघन केलं. पाकिस्तानी वायुदलाने पाकिस्तानी हवाईक्षेत्रात दोन भारतीय लढाऊ विमानं पाडली आहेत.
"त्यातलं एक विमान आझाद जम्मू-काश्मीरमध्ये (पाकिस्तान प्रशासित काश्मीर) पडलं तर दुसरं भारतीय काश्मीरमध्ये पडलं. एका भारतीय पायलटला अटक करण्यात आली आहे," असं पाकिस्तानी सुरक्षा दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Twitter / @DGISPR
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैजल यांनी एका निवेदनात याविषयी अधिक माहिती देताना सांगितलं की पाकिस्तानने नियंत्रण रेषा न ओलंडता नियंत्रण रेषेपलीकडे हल्ला केला आहे.
"हे भारताने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर नाही, पण आम्ही देखील सज्ज आहोत, हे सांगण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे," असं फैजल यांनी म्हटलं आहे.
"परिस्थिती तणावग्रस्त करण्याची आमची इच्छा नाही, पण जर तशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही सज्ज आहोत हे सांगण्यासाठी आम्ही हे केलं आहे. त्यामुळेच हा हल्ला आम्ही दिवसाढवळ्या केला," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
या हल्लात कुणी जखमी झालं नाही, असा पाकिस्तानने दावा केला आहे: "गेल्या काही वर्षांपासून भारताने आक्रमकतेची नवी पद्धत अवलंबली आहे. त्यांच्या या आक्रमकतेला आम्ही आव्हान देऊ शकतो. जर भारत पाकिस्तानमध्ये येऊन काही पुरावा नसताना सांगू शकतो की दहशतवादी तळांवर आम्ही हल्ले केले तर त्यांनी हे देखील विसरू नये की आमच्याकडे देखील तीच शक्ती आहे आणि आम्ही देखील हल्ला करू शकतो पण आम्हाला या मार्गाने जायचं नाही. भारताने शांततेचा मार्ग पत्करावा आणि एखाद्या परिपक्व लोकशाहीप्रमाणे हा मुद्दा सोडवावा."

सकाळी 11.30 - पाकिस्तानच्या लष्करी विमानांकडून नियंत्रण रेषेचं उल्लंघन
पाकिस्तानच्या कमीतकमी तीन लष्करी विमानांकडून नियंत्रण रेषेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं एका भारतीय अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं आहे.
जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये प्रवेश केलेल्या लढाऊ विमानांना भारतीय वायुदलाच्या विमानांनी परतवून लावलं, असं एका वरीष्ठ अधिकाऱ्याने PTI ला सांगितलं.

सकाळी 10.30 - दहशतवादाविरोधात चीनची भारताला साथ
"कट्टरतावाद आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी चीन पूर्ण सहकार्य करेल, असं प्रतिपादन चीनचे मुत्सद्दी वांग यी यांनी दिल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"हे फक्त आमची संयुक्त मोहीम नाही. आम्ही हा एक निर्धार केला आहे, कारण दहशतवादी संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे," असं स्वराज चीनच्या वुझेनमध्ये म्हणाल्या.

नेमकं काय झालं गेल्या 24 तासांत? 11 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या दिवसभरातल्या घडामोडी.

सकाळी 8.30 वाजता - अमेरिकाचा दोन्ही देशांना सल्ला
भारत आणि पाकिस्तान यांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती आणखी चिघळेल असं काहीही करू नये, असा सल्ला अमेरिकेने दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी एका निवेदनात सांगितलं की त्यांनी या कारवाईनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला. "या भागात शांतता नांदावी तसेच या हा भाग सुरक्षित राहावा यावर लक्ष केंद्रित करावे, असं मी त्यांना सांगितलं. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अमेरिकेचं सहकार्य राहील, असंही आपण त्यांना सांगितलं."
पाँपेओ यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांच्याशीही बोलून, "सद्यपरिस्थितीमध्ये तणाव कसा वाढणार नाही याकडे लक्ष देऊन लष्करी कारवाई टाळावी," अशी विनंती केली आहे.
तसंच पाकिस्तानच्या भूमीवर असलेल्या दहशतवादी गटांविरोधात अर्थपूर्ण कारवाई करावी, अशीही अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलं आहे.
दोन्ही देशात लष्करी कारवाई होऊ नये, यासाठी दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी एकमेकांच्या थेट संपर्कात राहावे, असं देखील त्यांना सुचवल्याचं पाँपेओ म्हणाले. ते सध्या व्हिएतनामच्य हनोईमध्ये दाखल झाले आहेत, जिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांची दुसरी भेट होणार आहे.

सकाळी 8.00 वाजता - रात्रभर सीमेवर गोळीबार
काश्मीरलगतच्या सीमेरेषेवर दोन्ही देशांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये रात्रभर तुफान गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. विरोधी सैन्यांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर करत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
मंगळवारी संध्याकाळी कोटली सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात चार पाकिस्तानी ठार तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एक लहान मूल आहेत.
रवाकोट, भांबर, चाकोत आणि कोटली या भागात मशीनगननं गोळीबार करण्यात आला आणि मोर्टार चालवण्यात आले. या गोळीबाराने कोटली जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा या घडामोडींचं सविस्तर आणि सखोल विश्लेषण -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








