मुंबईत उष्णतेची लाट कशामुळे आली? ही परिस्थिती किती दिवस राहणार?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईची हवा गेल्या काही दिवसांपासून बरीच तापली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई आणि परिसराचं तापमान 40 डिग्री सेल्सियसच्या आसपास असल्याचं पाहायला मिळतं.
मार्च महिन्यातच तापमान इतकं कसं वाढलं, त्यामुळे आता एप्रिल-मे महिन्यात काय परिस्थिती ओढवणार आहे, याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.
कुठे-कुठे वाढलं तापमान?
गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड तसंच कोकण किनारपट्टीच्या परिसरात तापमानात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तसंच गुजरातच्या किनारी भागातही अशीच तापमान-वाढ पाहायला मिळाली. गुजरातच्या सौराष्ट्र कच्छ, पोरबंदर, गीर, सोमनाथ, तसंच दीव-दमण या परिसरात उष्ण लहर आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मुंबईत तर 27 मार्च रोजी तापमानात विक्रमी वाढ झाली. मुंबईच्या सांताक्रूज परिसरात 27 मार्च दुपारी अडीचच्या सुमारास ला 40.6 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं.
तापमान कशामुळे वाढलं?
मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली. सुरुवातीच्या टप्प्यातच इतकं ऊन वाढल्याने नागरिकांना त्याचं आश्चर्य वाटलं.

फोटो स्रोत, Getty Images
पण ही उष्णता नेहमीसारखी नव्हती. मुंबई ही आपल्या दमट हवामानासाठी ओळखली जाते. पण गेल्या चार दिवसांत वातावरणात आर्द्रता नव्हती. उन्हाचे चटके बसत होते. शिवाय, असह्य अशा झळा येत होत्या. हे वातावरण मुंबईत नेहमीच आढळून येत नाही. साधारणपणे विदर्भ-मराठवाड्यात अशा प्रकारचं हवामान असतं.
मुंबईतलं किमान तापमान सरासरीच होतं. पण कमाल तापमान नेहमीपेक्षा 6 डिग्री सेल्सियसने जास्त नोंदवलं गेलं. असं घडण्याचं काय कारण असेल?
स्कायमेट या हवामान संस्थेने याचं उत्तर दिलं आहे. स्कायमेटच्या मते, ईशान्येकडून आलेल्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबई परिसरात ही परिस्थिती पाहायला मिळाली.
सध्या पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागात एका चक्रीवादळाचा प्रकोप सुरु आहे. याठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वारे त्या दिशेने वाहत आहेत. साधारणपणे, वारे हे समुद्रातून जमिनीकडे येत असतात. पण या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे उलट्या दिशेने वाहून पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत. या वाऱ्यांना नॉर्थ-इस्टरली वारे असं संबोधलं जातं.
या वाऱ्यामुळेच भारताच्या पश्चिम किनारी भागात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं स्कायमेट संस्थेने सांगितलं.
ही स्थिती किती दिवस राहील?
स्कायमेट संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवस ही परिस्थिती कायम असेल. 30 मार्च नंतर पाकिस्तानकडील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर नॉर्थ-ईस्टरली वारे पुन्हा नॉर्थ-वेस्टरली मध्ये रुपांतरीत होतील.
म्हणजेच पुन्हा ते समुद्राकडून जमिनीकडे वाहू लागतील. या समुद्री वाऱ्यांमुळे मुंबई परिसरातील वातावरणात पुन्हा आर्द्रता निर्माण होऊन येथील पारा खालावेल.
त्यामुळे येत्या मंगळवारनंतर (30 मार्च) मुंबईकरांना तापमानवाढीतून दिलासा मिळेल, असं स्कायमेटने सांगितलं आहे.
पण मुंबईकरांची कडक ऊनापासून सुटका होणार असली तरी त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील तापमान वाढू लागेल. 31 मार्च नंतर मराठवाडा-विदर्भासह पठारी भागात उन्हाच्या झळा वाढू लागतील, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
ही स्थिती नवी नाही
मुंबईत अशा प्रकारची परिस्थिती नवी नाही. साधारणपणे मार्च महिन्यात मुंबई आणि परिसरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मार्च महिन्यात तापमान वाढ नेहमीच होते. 28 मार्च 1956 रोजी तर मुंबईत 41.7 डिग्री तापमान नोंदवण्यात आलं होतं. ही मार्च महिन्यातलं सर्वाधिक तापमान आहे, असं होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितलं.
यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातील कमाल आणि किमान तापमानासंदर्भातील तक्ताही दिला. यावरुन मुंबईतील मार्च महिन्यातील सरासरी तापमान 38 ते 40 डिग्रींच्या आसपास असतं, हे आपल्याला दिसून येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
काय काळजी घ्याल?
तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
के. एस. होसाळीकर यांच्या मते, उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
ORS, लिंबू सरबत, तांदळाची गंजी, ताक आदी पेय पिता येऊ शकतात.
चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं.
किमान दोनवेळा थंड पाण्याने आंघोळ करावी.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास,
तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावे.
ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








