भीम जयंती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे दुर्मीळ फोटो कदाचित तुम्ही पाहिले नसतील

    • Author, संजीव चंदन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे. त्यानमित्तानं बीबीसीनं केलेली ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.

यात बाबासाहेबांचे काही दुर्मीळ फोटो याठिकाणी देत आहोत.

डावीकडून मुलगा यशवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्नी रमाबाई आंबेडकर, वहिनी लक्ष्मीबाई, भाचा मुकुंदराव आणि त्यांचा लाडका कुत्रा टॉबी. (फेबृवारी 1934)

मुंबईच्या कान्हेरी गुहेत डॉ. आंबेडकर फेरफटका मारताना. (1952-53)

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चौथी 'बौद्ध भ्रातृ संघ' परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान नेपाळचे राजे महेंद्र आणि महस्थवीर चंद्रमणी यांच्या उपस्थित डॉ. आंबेडकरांनी 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' हे प्रसिद्ध भाषण केलं होतं.

गंमत म्हणजे त्यांच्या भाषणाचा मूळ विषय 'बौद्ध धर्मातील अहिंसेची तत्वं' असा होता. पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी तो विषय बदलून 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' असा केला. ( 20 नोव्हेंबर 1956)

औरंगाबादमध्ये महाविद्यालयाचं भूमीपूजन केल्यानंतर डॉ. आंबेडकर आणि तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची एकत्रितपणे वेरुळची लेणी पाहिली होती. (1 सप्टेंबर 1951)

कायदामंत्री म्हणून डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिलावर संसदेत चर्चा करताना.

कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर मुंबईत परतले. (18 नोव्हेंबर, 1951) या दरम्यान, मुंबई प्रदेश 'शेड्यूल कास्ट्स फेडरेशन' आणि समाजवादी पक्षाच्यावतीनं बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर डॉ. आंबेडकरांच स्वागत करण्यात आलं.

त्यावेळी रायबहादूर सी. के. बोले यांना बसायला जागा नसल्यानं डॉ. आंबेडकरांनी त्यांना मांडीवर बसवलं. शेजारी माई आंबेडकर.

औरंगाबाद बार असोसिएशननं डॉ. आंबेडकर यांना आमंत्रित केलं होतं. (28 जलै 1950)

विद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजावेत यासाठी डॉ. आंबेडकर सतत प्रयत्नशील होते. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांनी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित केलल्या विद्यार्थी संसदेत हिंदू कोड बिलाच्या समर्थनात भाषण केलं होतं. (11 जून, 1950)

अखिल भारतीय दलित फेडरेशनचे निवडणूक घोषणापत्र. (1946)

चक्रवर्ती सी. गोपालचारी यांची भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलपदी निवड झाल्यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्नेहभोजन ठेवलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नेहरू यांच्यासोबत डॉ. आंबेडकर आणि इतर मंत्री. (जून 1948)

30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली. हे समजताच, डॉ. आंबेकडरांनी बिर्ला हाऊसकडे लगेचच धाव घेतली. त्यावेळी काँग्रेसचे नेते शंकरदेव यांच्याशी चर्चा करताना.

डॉ. आंबेडकर यांच्या धर्मांतराची वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी.

स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं डॉ. आंबेडकर यांनी मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळची निवडणूक पत्रिका. डॉ. आंबेडकरांचं निवडणूक चिन्ह 'माणूस' होतं.

कामगार मंत्री झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीत जाऊन आभार व्यक्त केले होते. (9 डिसेंबर 1943)

सर्व छायाचित्रं दीक्षाभूमी नागपूर आणि लोकवाड्.मय प्रकाशन यांच्या सौजन्यानं प्रकाशित केली आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.