अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू, फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिसभाई काय म्हणाला होता?

फोटो स्रोत, Twitter
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (8 फेब्रुवारीला) फेसबुक लाइव्ह करतानाच गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या गेल्याचे पोलिसांनी सांगितले.यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मॉरिसभाईने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जेजे हाॅस्पिटलमध्ये पोस्ट माॅर्टमनंतर अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह दहिसर येथील त्यांच्या घरी आणला आहे. आज शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर, आदित्य ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ते लिहितात, "अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो."
या घटनेनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना आश्रय देत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
पुणे आणि मुंबईत होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे विरोधकांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

फोटो स्रोत, X/ABHISHEK GHOSALKAR
"एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.' अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
वडेट्टीवार ट्वीटमध्ये पुढे लिहितात, "पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ही घटना चुकीची घडलेली आहे. अशा घटना घडू नये अशा मताचे मी पण आहे. पण तुम्ही मी गप्पा मरतोय. संभाषण स्पष्ट आहे. संभाषण ऐकल्यावर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत असं स्पष्ट आहे. उठताना घोसाळकर म्हणतात, आम्ही बस घेऊन जाणार. "
"ही घटना काळीमा फासणारी आहे. बाहेर पोलीस असेल तरी आत लोक धंदा-पाण्याच्या गप्पा करतायेत. एक जण हाफ चड्डीत दिसतोय त्यात. नेमके काय याचा तपास झाला पाहिजे. विरोधकांना निमित्त मिळाले आहे. आम्ही नाकारत नाही. तू आणि मी एका खोलीत थांबलो तर सिक्युरिटीला बाहेर थांबा असं सांगितलं तर ते बाहेर थांबणार. मी कोणाचे समर्थन करतो असा अर्थ काढू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी वर्षा वर जाऊन चर्चा केलेली आहे."

फोटो स्रोत, X/ADITYA THACKRAY
मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला आहे. फेसबुक लाइव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरीसने देखील स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात मॉरिसचा मृत्यू झाला आहे अशी एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. ”

फोटो स्रोत, BBC/SHARDUL KADAM
याबाबत डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले, “गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याची कायदेशीर मान्यतेची खात्री करतोय. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी दाखल केले होते, उपचारांती त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम पोलीस पथक करत आहे. फेसबुक लाईव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील."

फोटो स्रोत, X/@rautsanjay61
अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक हे मुंबईतल्या दहीसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक होते. तसंच ते मुंबै बँकेचे संचालकदेखील होते. घोसाळकर पितापुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत.
खासगी वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जातंय. अभिषेक यांना बोरीवलीच्या करूणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत. अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर हे माजी आमदार आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद आहे.
मॉरिस नोरोन्हा हे दहिसरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते, त्यातून त्यांच्यात वाद होता, असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
'आज बहोत लोग सरप्राईज होगे'
पूर्व वैमनस्य संपल्याचं दाखवत मॉरिसस आणि अभिषेक फेसबुक लाइव्हमध्ये एकत्र आले खरे. एकत्र आल्याचं दोघांनी दाखवलंही. हसून बोलत आता लोकांसाठी एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. पण पुढे काय होईल याची कल्पना कुणालाच आली नव्हती.
या फेसबुक लाइव्हमध्ये अभिषेक घोसाळकर म्हणतात, आज मॉरिसभाईबरोबर एकत्र लाइव्ह येण्याची संधी मिळाली आहे, अनेकजण सरप्राइज होतील. तितक्यात त्यांच्याशेजारी मॉरीसभाई येऊन बसतो आणि आज बहोतसारे लोग सरप्राईज होंगे असं म्हणतो. त्यानंतर तो आगामी काळात आपण रेशन वाटू, साड्या वाटू असं म्हणतो.

फोटो स्रोत, Twitter/AbhishekGhosalkar
लाइव्हमध्ये मॉरिस म्हणतो, "पण आज एकत्र येऊन काम केलं तर चांगलंच आहे. त्यामुळे लोकांचे आशीर्वादही मिळतील. नाशिकच्या बसचंही काम आम्ही केलं आहे."
यानंतर घोसाळकर सांगतात, "मॉरिसभाई म्हणतात तसं आम्ही एकत्र आलो आहोत, लोकांच्यासाठी काम करणार आहोत, लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. मॉरीसभाईनं आज धान्य आणि साड्या वाटण्याचा चांगला निर्णय घेतला आहे."
त्यानंतर मॉरिसभाई म्हणतो, हे सगळं मी यांच्याच मार्गदर्शनाखाली करत आहे. देवाच्या कृपेने यातून चांगलं काहीतरी बाहेर येईल. आता अभिषेक दोन मिनिटं बोलतील आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू असं सांगून मॉरिस उठून जातो.

फोटो स्रोत, BBC/SHARDUL KADAM
10 तारखेपासून मुंबई-नाशिक, नाशिक मुंबई बस सुरू करणार आहोत. लोकांना एकत्र येऊन काम करू असं ते सांगतात. अध्येमध्ये मॉरिस येऊन जात असताना दिसतो.
यावेळेस घोसाळकर आमच्यातला गैरसमज दूर झाला आहे. आता यापुढे गरीब लोकांसाठी काम करत राहू असं ते सांगतात. 'विल गो आऊटसाईड गॉड ब्लेस यू,' असं सांगत घोसाळकर उठतात आणि त्यानंतर क्षणार्धात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात.
'महाराष्ट्रात गुंडाराज' - संजय राऊत
काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्वीट करून एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. त्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
“महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या. ”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाही त्यांनी मागितला आहे.
गोळ्या झाडणारा मॉरिसभाई कोण आहे?
मॉरिसभाई नावाने प्रसिद्ध असलेला ही व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणवत होती.
मॉरिसभाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्याविरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

फोटो स्रोत, BBC/SHARDUL KADAM
या मॉरिसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या मॉरिसभाईने एका महिलेची 88 लाखांची फसवणूक केली होती.
तसंच या महिलेवर बलात्कार करून तिची व्हीडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
या धमकीचा कथित व्हीडिओही व्हायरल झाला होता. एवढंच नव्हे तर न्यायालयात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावलं होतं.
बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या आहेत त्या योग्यवेळेवर पुढे आणल्या जातील- देवेंद्र फडणवीस
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तपासाबद्दल माहिती दिली.
“अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. अशा एका तरुण नेत्याची हत्या होणं हे अत्यंत गंभीर आहे. मात्र याला काही राजकारणाचा रंग देत आहेत ते चुकीचे आहे. 2024मध्येही मॉरिस आणि घोसाळकर यांची एकत्रित पोस्टर्स लागली आहेत. ते एकत्रित काम करत होते. मात्र त्यांच्यात एवढा बेबनाव का झाला, की त्यांनी अभिषेक यांना गोळी घातली? याचा तपास सुरू आहे.
बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या आहेत त्या योग्यवेळेवर पुढे आणल्या जातील. या घटनेत काही कारणं समोर येत आहेत. ती कन्फर्म झाली की समोर आणली जातील. ही घटना गंभीर आहे, त्यामुळे त्याचं राजकारण करणं योग्य नाही. यामुळे कायदासुव्यवस्था संपली असं म्हणणं योग्य नाही कारण वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली घटना आहे.”
अशा बातमी आधी फक्त बिहार-उत्तर प्रदेशातून येत असत-वडेट्टीवार
ही घटना सामान्य माणसाला चीड आणणारी असून अशा बातमी आधी फक्त उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून येत असत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, "फेसबुक लाइव्ह वर एका लोकप्रतिनिधी वर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते?

फोटो स्रोत, Twitter
"शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे.
"एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.
"अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे.
"राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का?" असं वडेट्टीवार म्हणाले.

फोटो स्रोत, X/Tejaswighosalkar
माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही ट्वीट करुन सरकारवर टीका केली आहे. ते लिहितात, "गुंडाराज! फेसबुक लाइव्ह मध्ये गोळीबार करायचं धाडस येतं कुठून? जेव्हा कायद्याची भीती ऊरत नाही तेव्हाच हे घडते! आपलं राज्य एवढं असुरक्षित कधी पासून झालं, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा ?"

फोटो स्रोत, X/NANAPATOLE
घोसाळकरांच्या कुटुंबीयांचे पुढे काय होणार? वर्षा गायकवाड यांचा सवाल
याबद्दल काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही ट्वीट केले आहे, त्या लिहितात,
"जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले.
आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर या नवोदित राजकीय नेतृत्वावर बेधडक गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या भयानक प्रकरणाची चौकशी होईलच पण आता प्रश्न उपस्थित होतो तो कायदा-सुव्यवस्थेचा.. घोसाळकरांच्या कुटुंबीयांचा.. अभिषेक यांच्या वडिलांचा.. त्यांच्या पत्नी-मुलाबाळांचा..
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
जिवंतपणी बापाला मुलाचं मरण पाहावं लागलं याहून मोठं दुर्दैव काहीच नाही. अभिषेक घोसाळकर यांना दोन लहान मुलं आहेत. त्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपून गेलं. आता पुढे काय? हा सवाल आपला जोडीदार गमावलेल्या त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांना सतावत असेल..
घोसाळकर कुटुंबावर कोसळलेलं हे दुःखाचं डोंगर फार मोठं आहे. मी त्यांच्या भावनांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. अभिषेक घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानाने महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच बिकट होत चालली आहे. वाढत्या गोळीबाराच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणे आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणे, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचे राजकारण वाढणे या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. मुंबईकर हे त्यांच्या राहत्या परिसरात सुरक्षित आहेत याची हमी गृहमंत्री कशी देणार आहेत? याचे काही उत्तर आहे का त्यांच्याकडे?"











