कोरोना लस : संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही - केंद्रीय आरोग्य सचिव

फोटो स्रोत, PA Media
संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही. मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, असं वक्तव्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे.
विज्ञानाशी संबंधित जे मुद्दे असतात, त्यावर जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा विषयाशी निगडीत मूलभूत माहिती घेऊनच आपण आलो तर चांगलं होईल. मगच विश्लेषण करू शकतो, असं ते पुढे म्हणाले आहेत.
देशातल्या सगळ्यांचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही याचा भूषण यांनी पुनरुच्चार केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करू शकलो तर त्याद्वारे संसर्गाची साखळी तोडता येईल. त्यानंतर सगळ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची आवश्यकता नाही, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं.
मास्कची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लसीकरण मोहिमेनंतरही मास्कची भूमिका निर्णायक असेल. एका छोट्या वर्गापासून लसीकरणाला सुरुवात होईल. त्यामुळे लसीकरण मोहिमेदरम्यान आणि नंतरही मास्कची भूमिका कळीची असेल, असं त्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




