दसरा : ओटीटीवर कसली कसली चित्रं येतात, त्यावर नियंत्रण कुणाचं? - मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images
समाज तोडणारी नव्हे, जोडणारी भाषा हवी, असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधन केलं.
आपण एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे, असं आवाहन मोहन भागवत म्हणाले.
भागवत म्हणाले, "हिंदू समाज आपल्या 'स्व'ला समजू नये म्हणून बरेच प्रयत्न सुरू आहेत. जे भारताचं आहे, त्यांची चेष्टा केली जाते. भारताच्या इतिहासाची चेष्टा करण्याचा प्रयत्न दिसतो."
"ओटीटीवर कसे कसे चित्र येतात. आता कोरोनामध्ये तर लहान मुलांच्या हातात मोबाईल आले. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. ओटीटीवर कुणाचं नियंत्रण नाही. हे सर्व कसं रोखलं जावं, हे माहित नाही," असं म्हणत भागवतांनी ओटीटीवरही भाष्य केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यावेळी मोहन भागवत यांन आसाम-नागालँडच्या वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "भारतातल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरोधात गोळीबार करतात. पक्षा-पक्षातील वाद ठीक, पण दोन सरकारमध्ये वाद कसे होतात? वी द पिपल ऑफ इंडिया म्हणजे आपण एक राष्ट्र आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका आहे. काही लोक म्हणतात, नाही येणार. पण कुठल्याही अंदाजावर अवलंबून न राहता, आपण तयार राहिलं पाहिजे. प्रत्येक गावात चार-पाच कोरोनायोद्धे असायला पाहिजे. संघानं यासाठी जवळपास पूर्ण तयारी केलीय," असं मोहन भागवत म्हणाले.
कोरोनाचं संकट 'स्व'चा विचार करण्याची संधी बनलीय, असंही भागवत म्हणाले.
भागवत म्हणाले, "घरात आपण आपली भाषा बोलतो. कागदांवर आपण मातृभाषेत लिहितो ना. जिथं परदेशी भाषाचा वापर आवश्यक आहे, तिथे करावा. मात्र, आपल्या 'स्व'चं महत्त्वं आहेच."
तालिबानबाबत भागवत म्हणाले, "वायव्य सीमेपलिकडे तालिबन उभं राहिलंय. तालिबानचा इतिहास आपल्याला माहित आहे. तालिबानपासून सावधान राहायला हवं. तालिबानचं समर्थक पाकिस्तान, चीन आजही आहेच. तालिबान बदललं असेल, पाकिस्तान बदललंय का? तर नाही. संवादातून सर्व ठीक होतं. मात्र, आपली तयारी, सतर्कता पूर्ण असली पाहिजे. आपली सीमा सुरक्षा आणखी चांगली असायला हवी."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








