संजय राऊतांचा गंभीर आरोप, ‘मुख्यमंत्र्यांच्या मुलाने माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिलीय’

संजय राऊत

फोटो स्रोत, ANI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिलीय, असा गंभीर आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊत यांनी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे.

संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात असंही म्हटलंय की, माझ्यावर हल्ल्या करण्याची माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "राजा ठाकूर हा जामिनावर सुटलेला गुंड आहे. त्याला ही सुपारी दिलीय. माझी माहिती विश्वसनीय आहे."

संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलंय?

संजय राऊत यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "गेली 40 वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणाबरोबर पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात व तसे प्रयत्नही झाले.

"मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरीत्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून, मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे."

संजय राऊत

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, संजय राऊत

यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माध्यमांमध्ये प्रसिद्धीत राहण्यासाठी संजय राऊत ही स्टंटबाजी करतायेत. उरलेल्या शिवसैनिकांना भावनात्मक राजकारणानं फसवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे."

"संजय राऊत विषयहीन बोलत असतात. त्यांना गांभीर्य घेण्याचं कारण नाही," असंही नरेश म्हस्के म्हणाले.

हे वाचलंत का?