‘हमालांचं गाव’ ते महाराष्ट्रातील रेशीम हब, बीडमधल्या रुई गावची प्रेरणादायी गोष्ट
ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या ‘रेशीम हब’ची. रुई गावाची. बीड जिल्ह्यातल्या रुई गावात तब्बल बाराशे एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आलीय.
गावात प्रवेश करताना रेशीम शेतीसाठी उभारण्यात आलेले शेड तुम्हाला सगळीकडे दिसतील. पाण्याचा कुठलाही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळे 2010 पर्यंत इथले शेतकरी कापूस हेच मुख्य पीक घेत होते.
पण, त्यानंतर गावातील काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आता हेच लोण 550 शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहचलंय. रेशीम शेतीमुळे इथल्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदललंय. कसं ते पाहा...
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – गणेश वासलवार
एडिट – निलेश भोसले
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



