भारताचा 25 मिनिटात 9 ठिकाणी हल्ला; रात्रीतून कुठे काय घडलं?
भारताचा 25 मिनिटात 9 ठिकाणी हल्ला; रात्रीतून कुठे काय घडलं?
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील 9 ठिकाणी हल्ला केला.
विशेष म्हणजे, 7 मेच्या मध्यरात्री केवळ 25 मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली. मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेलं 'ऑपरेशन सिंदूर' 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली.
दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताने 6 ठिकाणी विविध शस्त्रांचा वापर करून एकूण 24 हल्ले केल्याचं म्हटलं.
"पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं," अशी माहिती भारत सरकारनं दिली. या हल्ल्यांमध्ये नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं नाही, असंही भारतानं नमूद केलं.






