'सरकारला पाणी प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही, कारण पुरुषांना तो मोठा प्रश्न वाटत नाही' - व्हीडिओ
"माझं आयुष्य पाण्याभोवतीच फिरतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचाच विचार माझ्या डोक्यात असतो," असं पालघरमध्ये राहणारी 18 वर्षांची यशोदा सांगते.
2019चं ज्या निवडणुका होत आहेत त्यात मी पाण्यासाठीच मत देणार आहे आणि मीच नाही तर आमच्या गावातल्या सगळ्या बायका पाण्यासाठीच मत देणार आहेत, असं यशोदा सांगते.
यशोदा राहते तिथे भरपूर म्हणजे, 3,287 मिमी इतका पाऊस पडतो. तरीही वर्षातले 8 महिने इथे पाणी टंचाई असते.
संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार जगभरात महिला दररोज 20 कोटी तास पाणी आणण्यासाठी खर्च करतात.
भारतात 46 टक्के महिला रोज 15 किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटं पाणी आणण्यासाठी खर्च करतात. यामुळे देशाचं दरवर्षी 1000 कोटींचं नुकसान होतं.
व्हीडिओ शूट आणि एडिट - पीयूष नागपाल
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)