अविश्वास प्रस्ताव फेटाळला : नरेंद्र मोदी सरकारवर लोकसभेचा विश्वास कायम

फोटो स्रोत, loksabha
देशातलं राजकारण ढवळून काढणाऱ्या अविश्वास प्रस्तावाचा कौल लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने लागला आहे.
तेलुगू देसम पक्षानं नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत असंमत झाला. सरकारच्या बाजूने 325 तर विरोधकांना फक्त 126 मतं मिळाली आहेत. या मतदानाच्या वेळी लोकसभेत 451 खासदार उपस्थित होते.
या प्रस्तावावर सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने संपूर्ण कामकाजावर बहिष्कार घातला. मतदानाची वेळ आल्यास शिवसेना तटस्थ राहील, असं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आधीच सांगितलं होतं. पण शिवसेनेचे खासदार लोकसभेत चर्चेसाठीही गेले नाहीत.
मोदींनी मानले आभार
मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मित्र पक्षांचे आभार मानले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आहोत असं खासदारांनी माध्यमांना सांगितलं.

फोटो स्रोत, LokSabha TV
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी दिवसभर चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जवळपास तासभर भाषण करत आपल्या सरकारचा बचाव केला नि विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली.
त्यानंतर अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या TDPच्या उत्तरानंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी आवाजी मतदान घेतलं. पण त्यानंतर मतदान यंत्राद्वारे मतविभाजन घेण्यात आलं.
त्यातून लोकसभेचा विश्वास मोदी सरकारवर कायम आहे, असं स्पष्ट बहुमत पुढे आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








