सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्यावर पहिल्या मुलाखतीत काय काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून भारत, मुंबई पाहून काय वाटलं?
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्यावर पहिल्या मुलाखतीत काय काय सांगितलं?

पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी पहिल्यांदाच आपले अंतराळातील विविध अनुभव सांगितले आहेत.

त्यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्याशिवाय निक हेग हे अंतराळवीरदेखील उपस्थित होते.

ह्यूस्टनमधील (टेक्सास) जॉनसन स्पेस सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 9 महिन्यांहून अधिक काळ कसा घालवला, त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा अनुभव कसा होता याविषयी आपली मतं मांडली. यासोबतच, त्यांनी भारताबाबतही चर्चा केली.

त्यांनी स्पेस स्टेशनमध्ये असताना शरीरावर पडणारा प्रभाव तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर होणाऱ्या परिणामांविषयीही भाष्य केलं.

यासोबतच, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून (आयएसएस) भारत आणि हिमालय कसा दिसतो, याबाबतही त्यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भाष्य केलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)