राहुल गांधींनी सांगितले आजी आणि वडिलांना गमावल्याचे ते क्षण...
राहुल गांधींनी सांगितले आजी आणि वडिलांना गमावल्याचे ते क्षण...

"हिंसा काय असते मला कल्पना आहे. मी हिंसा बघितली आहे, सहनही केली आहे. ज्याने हिंसा पाहिलेली नाही, अनुभवलेली नाही त्याला ही गोष्ट कळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत त्यांनी हिंसा पाहिलेली नाही, ते घाबरतात", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
काश्मीरमध्ये 'भारत जोडो' यात्रा संपल्यानंतर जोरदार बर्फवृष्टीत बोलताना त्यांनी आजी आणि वडिलांना गमावलं त्या क्षणांची आठवण सांगितली.






