विमा कंपनीच्या काट्यावरील 5 किलो वजन प्रत्यक्षात 3 किलोच भरलं

व्हीडिओ कॅप्शन, विमा कंपनीच्या काट्यावरील 5 किलो वजन प्रत्यक्षात 3 किलोच भरलं, शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्यासाठी कंपनीनं मापात पाप केलं?
विमा कंपनीच्या काट्यावरील 5 किलो वजन प्रत्यक्षात 3 किलोच भरलं

परभणी जिल्ह्यातल्या खरब धानोरा गावात शेतकऱ्यांनी जेव्हा सोयाबीनचं वजन विमा कंपनीच्या काट्यावर मोजलं तेव्हा ते 5 किलो 400 ग्रॅम भरलं. पण त्याच सोयाबीनचं वजन गावातल्या दुकानदाराच्या काट्यावर केलं तर ते फक्त 3 किलो होतं. दोन काट्यांमध्ये एवढा फरक कसा? हा तांत्रिक बिघाड होता की शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्याचं षड्यंत्र? पीक विमा देताना वजनात फरक कसा? यावर बीबीसी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट– श्रीकांत बंगाळे

शूट– किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर