कोरोना लॉकडाऊन : कामगार कायदे बदलून मजुरांचं भलं होणार की उद्योगांना चालना मिळणार? #सोपीगोष्ट 76
कोरोनाच्या व्हायरसमुळे एकीकडे जगासमोर आरोग्य संकट उभं राहिलं असतानाच आता जगाला आर्थिक महामंदीचाही सामना करावा लागतोय.
एकीकडे या स्थलांतरितांच्या पोटापाण्याच्या प्रश्न उभा राहिलाय तर दुसरीकडे उद्योगधंदे पुन्हा सुरु करून त्यांना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसारख्या काही राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
कामगार कायद्यात बदल केल्यानं नेमकं काय साध्य होणार आहे? केलेले हे बदल खरंच सुधारणा किंवा reforms आहेत, की मालकांसाठी मजुरांच्या छळवणुकीचा मार्ग खुला झालाय? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
ही सोपी गोष्ट आहे कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविषयी.
संशोधन – गुलशनकुमार वनकर
निवेदन – विनायक गायकवाड
एडिटिंग – शरद बढे

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)