'भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या, त्यांचा विजय अनैतिक आहे' - ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसवर भाजपने मोठी आघाडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर 'मतचोरी' केल्याचा आरोप केला.
त्या पत्रकारांना म्हणाल्या की, "भाजपने 100 हून अधिक जागा चोरल्या आहेत. भाजपने घोटाळा केला आहे. निवडणूक आयोग आता भाजप आयोग बनला आहे. आम्ही वेळोवेळी याबद्दल तक्रार केली आहे. पण कोणी ऐकलं नाही."
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजपचा विजय अनैतिक आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या संगनमताने जे काही केले आहे ते पूर्णपणे अनैतिक आहे. त्यांनी जबरदस्तीने एसआयआर (SIR) राबवला. त्यांनी अत्याचार केले. त्यांनी मतमोजणी प्रतिनिधींना अटक केली. आम्ही प्रत्युत्तर देऊ."
पश्चिम बंगालमध्ये, रात्री 8.25 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपने 136 जागा जिंकल्या होत्या आणि 72 जागांवर आघाडी घेतली होती. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने 49 जागा जिंकल्या होत्या आणि 30 जागांवर आघाडी घेतली होती.

















