निखिल वागळे राज ठाकरे उद्धव ठाकरे युती, पवारांची आघाडी याबद्दल काय विश्लेषण करतात?

निखिल वागळे राज ठाकरे उद्धव ठाकरे युती, पवारांची आघाडी याबद्दल काय विश्लेषण करतात?

बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी या निवडणुकीचं विविधांगी विश्लेषण केलं.

मुंबईच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे सोबत नसते तर भाजपला हा विजय मिळाला नसता. ज्या पद्धतीने मुंबई जिंकायची इच्छा भाजपची होती, ती त्या पद्धतीनं पूर्ण झालेली नाहीये, असंही निरिक्षण त्यांनी मांडलं.

ते म्हणाले की, "2022 साली साम-दाम-दंड-भेद वापरून शिवसेना जी फोडली, त्याच गोष्टीचा हा पूर्णविराम आहे. एकनाथ शिंदेंचा वापर जवळजवळ संपलेला आहे. आता भाजप त्यांचं पुढे काय करतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे."

राज ठाकरे यांच्या कामगिरीबाबत बोलताना ते म्हणाले की, "राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घ्यायला हवा. फक्त सहा नगरसेवक मुंबईत का निवडून आले? अनेक प्रभागांमध्ये मनसेची मतं उद्धव ठाकरेंना गेलेली आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं खरोखरच मनसेकडे आली आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)