'माझ्या मुलीला ताप आला, दवाखान्यात जायला रस्ता नसल्याने अर्ध्यातच जीव गेला'

व्हीडिओ कॅप्शन, पालघर: 'माझ्या मुलीला ताप आला, दवाखान्यात जायला रस्ता नसल्याने अर्ध्यातच जीव गेला'
'माझ्या मुलीला ताप आला, दवाखान्यात जायला रस्ता नसल्याने अर्ध्यातच जीव गेला'

पालघर जिल्ह्यातल्या म्हसेपाड्याचा संपर्क दर पावसाळ्यात तुटतो. गारगाई आणि पिंजाळ नदीच्या संगमावरच्या या पाड्यात 290 लोकांची वस्ती आहे.

पाड्यात पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने गावकऱ्यांना नदी आणि जंगलातून वाट काढावी लागते. पावसाळ्यात गारगाई नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर फळीच्या सहाय्याने नदी ओलांडावी लागते.

तर नदीला पूर येऊन बंधाऱ्याच्या वरून पाणी वाहत असेल तर टायर ट्युबच्या साहाय्याने नदी ओलांडावी लागते.

दुसरीकडे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेवरून जायचे असल्यास 4 किलोमीटर पायी चालून वाडा तालुक्यातील टोपले पाडा गाठावा लागतो.

अशात आरोग्याची समस्या असलेल्या कुठल्या रुग्णाला दवाखान्यात नेतानाच अनेकदा त्याचा मृत्यू होतो.

पाहा अशाच एका लेकीच्या वडिलांनी सांगितलेली ही आपबीती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)