बाहेरच्या जगापासून आजही दूर असलेल्या आदिवासींवर ग्रेट निकोबार प्रकल्पाचा काय परिणाम होईल?
बाहेरच्या जगापासून आजही दूर असलेल्या आदिवासींवर ग्रेट निकोबार प्रकल्पाचा काय परिणाम होईल?
भारताला ग्रेट निकोबार बेटावर हाँगकाँग आणि सिंगापूरसारखं एक मोठं बंदर उभारायचं आहे आणि त्या प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवादानं पुन्हा ग्रीन सिग्नल दिलाय.
पण या प्रकल्पामुळे लाखो झाडं, प्रवाळं, दुर्मिळ कासवं, पशु-पक्षांच्या प्रजाती आणि मूळचे रहिवासी असलेले शाँपेन आदिवासी यांच्यावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
ग्रेट निकोबार प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि त्याला विरोध का होतो आहे, त्यावर सरकारचं आणि पर्यावरणप्रेमींचं काय म्हणणं आहे? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.






