भारतात वीज पुरवठ्याची स्थिती कशी आहे?

    देशातल्या सगळ्या गावांपर्यंत वीज पोहोचली असल्याचं नरेंद्र मोदी
    सरकारनं शनिवारी जाहीर केलं. त्यात किती तथ्य आहे?

    News imageNews imageNews image
    हा पूर्ण ताज महाल आहे का?

    सरकारच्या विद्युतीकरण निकषांनुसार असूही शकतो.
    News image
    गावातली 10 टक्के घरं आणि सर्व सार्वजनिक इमारती ग्रिडशी जोडल्या गेल्या की त्या गावाचं विद्युतीकरण झाल्याची सरकार दरबारी नोंद होते.
    News image

    एक घर म्हणजे एक कोटी घरं असं मानलं तर...

    News image
    सरकारी आकडेवारीनुसार, देशातल्या 82 टक्के घरांचं विद्युतीकरण झालेलं आहे.
    News image
    परंतु, 3.1 कोटी घरांत अजूनही वीज नाही.

    ‘सौभाग्य' योजनेत (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) 14,84,11,158 घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

    News image

    एक बल्ब म्हणजे एक राज्य मानलं तर...

    News image
    देशातल्या 29 राज्यांपैकी केवळ सहा राज्यांत
    24 तास वीज पुरवठा होतो.

    DDUGJY नुसार, डिसेंबर 2017 पर्यंत, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, प. बंगालमध्ये 24 तास वीजपुरवठा होतो.

    News image

    गावातली 10 टक्के घरं आणि सर्व सार्वजनिक इमारती ग्रिडशी जोडल्या गेल्या की त्या गावाचं विद्युतीकरण झाल्याची सरकार दरबारी नोंद होते. ऑगस्ट 2015मध्ये मोदींनी 15 हजार कोटी खर्चून डिसेंबर 2018 पर्यंत देशातल्या सर्व घरांत वीज जोडणी देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं.

    या योजनेत 597,464 गावं आणि पाच कोटी घरांपर्यंत वीज पोहोचवण्यात आली आहे.

    1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशानं खूप प्रगती केली आहे.

    1947मध्ये...

    फक्त 1500 गावांतच वीज होती.

    2005-2014 या काळात...

    1,082,280 गावांत वीज पोहोचली.

    मे 2018 पर्यंत...

    आणखी 18,452 गावांमध्ये वीज पोहोचेल. त्यामुळे देशातल्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचलेली असेल.

    बहुतांश गावांमध्ये काही नाकाही स्वरूपात वीज जोडणी पोहोचली असली तरी दुर्गम भागातल्या घरांपर्यंतवीज पोहोचवणं खर्चिक असतं.

    वीज पुरवठ्यातली अनिश्चितता आणि महिन्याचं बील यामुळे काही लोक वीज जोडणी नाकारू शकतात.