महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचं पिक वाया गेलंय. अहमनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात शेतकरी कुटुंब उरला-सुरला सोयाबीन वाचवण्याचा प्रयत्न करतायत.
पाऊस थांबला असला तरी त्यांच्या शेतातून पाणी ओसरलेलं नाही. हीच परिस्थिती इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीदेखील झाली आहे. काही लाख रुपयांचा कांदा थेट साचलेल्या पाण्यात तरंगू लागलाय.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यालगत कांदा व्यापाऱ्यांनी नऊ ते दहा शेडमध्ये साठवण ठेवलेला कांदा पाण्याखाली गेला. कोट्यवधी रुपयांचा हा कांदा असल्याचादावा इथल्या व्यापाऱ्यांनी केला आहे. लवकर पंचनामे झाले नाहीत तर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
एकीकडे शेतं पाण्यात गेलेली असताना कोपरगावमध्ये काही शेतकऱ्यांची घरं देखील पाण्याखाली गेलीयत. त्यामुळे शेतीतला गाळ उपसायचा की घरातला चिखल काढायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झालाय.
बुलडाणा, औरंगाबाद इथेही पावसामुळे एवढंच मोठ नुकसान झालंय. बुलडाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर आणि परिसरात अतिवृष्टी झालीय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)