मोदी सरकारच्या 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर पॅकेजचं नेमकं काय झालं? | सोपी गोष्ट 351
कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. आणि याच नावाअंतर्गत कामगार वर्ग आणि लघु, मध्यम उद्योजकांसाठी 20,00,000 कोटींचं एक पॅकेजही त्यांनी जाहीर केलं.
आता एक वर्षं उलटलं. या वर्षभरात केंद्रीय आकडेवारी असं सांगते की, देशाचा जीडीपी म्हणजेच विकास दर 7.3% नी कमी झाला आहे. मग आत्मनिर्भर भारत योजनेवर खर्च झालेले 20 लाख कोटी रुपये नेमके गेले कुठे? कोरोना काळात सरकारकडून लोकांना नेमकी किती आणि कशी मदत मिळाली? की मिळालीच नाही? पाहूया सोपी गोष्टमध्ये...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
संशोधन- सरोज सिंह
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले