You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

विधानसभा निवडणूक निकाल : हा नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, गरीबांचा विजय- नरेंद्र मोदी

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. "महाराष्ट्राचा विचार करता भाजपला शिंदे किंवा अजित पवारांची गरज नाही. तर त्यांना भाजपची गरज आहे. कारण भाजपकडं मोदी आणि यंत्रणा मजबूत आहे," असं स्पष्ट मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे.

    देशात आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या चार राज्यांतील या निवडणुकीकडं लिटमस टेस्ट म्हणून पाहण्यात येत होतं. त्यामुळं या निकालाकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं.

    चार राज्यांच्या निवडणुकांचे निकालाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेतील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांत सत्ता मिळवत भाजपनं बाजी मारली, तर काँग्रेसनं तेलंगणात केसीआर यांना धोबीपछाड दिली आहे.

    या संपूर्ण निकालाचा नेमका अर्थ काय आहे आणि भविष्यातील घडामोडी आणि राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने त्याचे काय पडसाद उमटणार आहेत याचं विश्लेषण 'लोकसत्ता'चे संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक गिरीश कुबेर यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना केलं आहे.

    मध्य प्रदेशातही काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर त्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रकार घडला. तरीही मध्य प्रदेशात कौल भाजपाच्याच बाजूने लागला.

    त्यामुळे आता या निकालाचा महराष्ट्रात काय परिणाम होईल, एकनाथ शिंदे-अजित पवारांसाठी हा निकाल किती महत्त्वाचा आहे, यावरही गिरीश कुबेर यांनी भाष्य केलं.

    सध्या विरोधी पक्षात राहण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही. त्यात जुनी प्रकरणं बाहेर निघण्याचा धाक, भीती किंवा इतर काहीही कारणं असू शकतात. पण भाजपला आणखी यश मिळालं तर हे प्रकार जास्त वाढतील, असं मत कुबेर यांनी मांडलं.

    "महाराष्ट्राचा विचार करता भाजपला शिंदे किंवा अजित पवारांची गरज नाही. तर त्यांना भाजपची गरज आहे. कारण भाजपकडं मोदी आणि यंत्रणा मजबूत आहे.

    पण गरज नसतानाही त्यांच्यासोबत राहावं लागणं हे भाजपचं राजकीय यश आणि विरोधकांचा पराभव आहे."

    त्यामुळं हे चित्र असंच राहिलं तर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही त्याचा फायदा होईल आणि निकाल कसा लागेल हे वेगळं सांगावं लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

    राज्यात पाच वर्षांपूर्वी काय झालं ते झालं. पण जनतेची स्मरणशक्ती कमी असते. मतदार त्याचा राग ते मनात धरून ठेवत नाहीत, असं मत कुबेर यांनी मांडलं.

    "लोकांच्या मनात राग आहे, यात शंकाच नाही. त्यामुळंच राज्यात अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. पण हा राग शांत करण्याचा मार्ग भाजपकडं आहे. भाजप तो प्रयत्न करत आहे. जितक्या निवडणुका होत जातील तितका तो राग शांत होत जाईल आणि राग निवळला तर काय होतं ते मध्य प्रदेशात दिसून आलं."

  2. 'या निवडणुकीमुळे भ्रष्टाचाराला थारा नाही, हेच सिद्ध झालं'- नरेंद्र मोदी

  3. हा नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, गरीबांचा विजय- नरेंद्र मोदी

    मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या लोकांनी भाजपावर भरपूर स्नेह दाखवला. तेलंगणातही भाजपाप्रती समर्थन सतत वाढत आहे. त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो. हे सगळं पाहाता माझी वैयक्तिक जबाबदारी आणखी वाढते अशी माझी भावना आहे. मी आपल्या माता, बहिणी, युवा, मुली, शेतकरी बांधव यांनी जे आम्हाला समर्थन दिलं, त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो.

    या निवडणुकीनं देशाला जातीत विभागण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी सतत हेच सांगत होतो की माझ्यासाठी 4 जातीच मोठ्या आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब परिवार याच त्या जाती. त्यांना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल.

    आज आमचे सहकारी आदिवासी आणि ओबीसी मोठ्या संख्येने आहेत. आज प्रत्येक गरीब व्यक्तीला आपणच जिंकलो असं वाटत आहे. शेतकऱ्यांना आपण जिंकलोय असं वाटतंय.आदिवासी भाऊ-बहिणींना आपला विजय झालाय असं वाटतंय. प्रथम मतदान करणारेही माझं पहिलं मत मला विजय मिळवून देणारं ठरलंय असा विचार करत आहेत. आज स्त्रिया आणि युवावर्गही या निवडणुकीत स्वतःचा विजय पाहात आहे. प्रत्येक नागरिक यात स्वतःचं यश पाहातोय.

    भाजपाचा झेंडा फडकवणारच या विचाराने नारीशक्ती घराबाहेर पडली आणि त्यांनी संरक्षण दिलं की कोणतीही शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. प्रत्येक महिलेमध्ये भाजपा सरकारमध्ये त्यांच्या सक्रीय भागिदारीला नवं स्थान मिळणार आहे हा विचार आला आहे. भाजपाच महिलांचा सन्मान, महिलासुरक्षेची सर्वात मोठी गॅरंटी बीजेपीच आहे हे महिलांना समजलं आहे.

  4. भाजपचा 3 राज्यांत विजय कसा झाला? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचं विश्लेषण

  5. पंतप्रधान कार्यकर्त्यांना संबोधित करणार

    तीन राज्यांत भाजपाला मोठं यश मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना अभिवादन. दिल्लीमध्ये भाजपाच्या मुख्यालयामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.

  6. 'भाजपला आता शिंदे, अजित पवारांची गरज नाही,' असं गिरीश कुबेर यांना का वाटतं?

  7. आता ईव्हीएमला जबाबदार ठरवतील- अजित पवार

    तीन राज्यांत भाजपाला मिळालेल्या यशानंतर अजित पवार यांनी विरोधकांना उद्देशून एक टोला लहावला आहे. आता इंडियाच्या नेत्यांनी ईव्हीएम खराब असल्याचा आरोप केला तर मला आश्चर्य वाटणार नाही असं ते म्हणाले.

    जर तुम्ही ईव्हीएमला दोषी ठरवलंत तर तेलंगणबाबतीत काय म्हणाल असा प्रश्नही त्यांनी केला.ते म्हणाले, फक्त एक व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईव्हीएममध्ये घोटाळा करू शकत नाही. त्यासाठी भरपूर लोक लागतील आणि मोठ्या प्रमाणावर ते झालं असतं तर ते समोर आलं असतं.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि त्यांचं काम लोकांना आवडतं हे स्वीकारलं पाहिजे असंही ते म्हणाले.

  8. बरेलअक्का : खात्यावर दीड हजार रुपये, तरीही केसीआर आणि रेवंत रेड्डींविरोधात लढणारी ही तरुणी कोण?

    करोडपती नेत्यांच्या लढाईत म्हशी राखणाऱ्या या मुलीने आमदारकीची निवडणूक का लढवली?

    अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बरेलअक्काने स्वतःच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासनं दिलीयत आणि मतदारांनी तिथे कुणाला कौल दिलाय?

    बरेलअक्काच्या विरोधकांनी तिच्याबाबत अनेक टोमणे मारले असले तरी सोशल मीडियावर मात्र तिने या सगळ्या नेत्यांना कडवी झुंज दिली आहे.वाचा पूर्ण बातमी- बरेलअक्का

  9. विचारधारेची लढाई सुरूच राहील- राहुल गांधी

    मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो, मात्र विचारधारेची लढाई सुरूच राहील असं ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणात मिळालेल्या स्पष्ट बहुमताबद्दल तेथील जनतेचे आभार मानले आहेत.

  10. दक्षिण भारतातून भाजपा संपली- मनोज झा

    राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांनंतर प्रतिक्रिया दिली. त्यात दक्षिण भारतातून भाजपा संपली आहे असं ते म्हणाले.

  11. भाजपाच्या रेड्डींनी केला केसीआर आणि रेवंत रेड्डींचा पराभव

    वेंकटरमना रेड्डी यांनी भाजपतर्फे या मतदारसंघातून म्हणजे कामारेड्डी तून दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. गेल्या वेळेस ते पराभूत झाले होते. पण उद्योजक आणि शेतकरी असलेले रेड्डी यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून तिथं पुढेही काम सुरू ठेवलं आणि भाजपने यावेळेस त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं.

    कामा रेड्डी हा वैशिष्ट्यपूर्ण मतदार संघ आहे तिथं गेल्या वेळेस गंपा गोवर्धन हे बी आर एस ते म्हणजेच केसियार यांच्या पक्षाचे आमदार झाले होते. पण यंदा मोठी ऑंटी असल्याने स्वतः केसीआर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवायची ठरवली. ते दोन अंगातून निवडणूक लढवत होते. के सी आर इथं निवडणूक लढवणार म्हणून रेवंत रेड्डी जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि केसीआर यांना आव्हान देतात तेही इथं निवडणूक लढवण्यासाठी आले.

    हा मतदारसंघ रेड्डी समाज बहुल आहे पण त्यासोबतच इथं दलित आणि मुस्लिम मतदान सुद्धा मोठं आहे. पण के सी आर आणि रेवंथ रेड्डी या दोघांच्या लढाईमध्ये तिसऱ्याचा फायदा होईल अशी शक्यता पूर्वीच व्यक्त करण्यात येत होती ती नेमकी प्रत्यक्षात आली. केसीआर आणि त्यांचा मुलगा केटीआर हे दोघेही इथे प्रचाराला वारंवार आलेच पण राहुल गांधी यांनी रेवंत रेड्डींसाठी आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी वेंकटरमना यांच्यासाठी इथं प्रचाराच्या सभा घेतल्या.

    अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये शेवटच्या काही राऊंडमध्ये रेवंत रेड्डी यांना बढत मिळाली होती पण शेवटी वेंकटरमना रेड्डी यांनी 3700 मतांनी विजय मिळवला.

  12. नम्रतापूर्वक जनादेश स्वीकारतो- अशोक गहलोत

    राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पराभव स्वीकारला आहे. आम्ही नम्रतापूर्वक हा जनादेश स्वीकारतो असं ट्वीट त्यांनी केलं आहे. आम्ही आमच्या योजना, कायद्यांना लोकांपर्यंत घेऊन जाण्यात पूर्णपणे यशस्वी झालो नाही हे या पराभवातून समजलं असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

  13. सचिन पायलट 29,475 मतांनी विजयी

    काग्रेस नेते सचिन पायलट राजस्थानच्या टोंक मतदारसंघात 29,475 मतांनी विजयी झाले आहेत, त्यांना एकूण 1,05,812 मते मिळाली आहेत.

  14. हमें ना रुकना है, ना थकना है। हमें भारत को विजयी बनाना है - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानात भाजपाला मिळत असलेल्या यशानंतर ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.या निकालामुळे लोकांचा सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मतदारांना धन्यवाद देताना महिला, मुली, बहिणी आणि युवा मतदारांना विशेष धन्यवाद देतो असं ते म्हणाले आहेत.

    'हम विकसित भारत के लक्ष्य को लेकर आगे बढ़ रहे हैं। हमें ना रुकना है, ना थकना है। हमें भारत को विजयी बनाना है। आज इस दिशा में हमने मिलकर एक सशक्त कदम उठाया है।' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

  15. गिरीश कुबेर LIVE: विधानसभा निकालांचं सोप्या भाषेत सखोल विश्लेषण

  16. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड जिंकल्यामुळे भाजपाकडे 12 राज्यं, काँग्रेसकडे उरली 3

    राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड जिंकल्यामुळे भाजपाकडे आता 12 राज्यांची सूत्रं आली आहेत, परंतु राजस्थान आणि छत्तीसगड गमावल्यामुळे काँग्रेसकडे फक्ती 3 राज्य राहिली आहेत.दिल्ली आणि पंजाबात सरकार चालवणारी आम आदमी पार्टी या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.भाजपाचे उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश येथेही सरकार आहे. आता त्यात राजस्थान आणि छत्तीसगडची भर पडत आहे.

    याशिवाय महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, सिक्कीम आणि पाँडेचेरीमध्ये भाजपा मित्रपक्षांबरोबर सत्तेत आहे.

  17. वसुंधराराजे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

    • वसुंधरा यांचं शिक्षण तामिळनाडूतलं हिल स्टेशन कोडाईकनाल इथे एका बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. त्या तिथे हाऊस कॅप्टन बनल्या आणि स्पर्धेला तोंड देत पुढे जायला शिकल्या.
    • 12 वी पर्यंत शिक्षण तिथे पूर्ण केल्यावर वसुंधरा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात ऑनर्ससह पदवी घेतली.
    • कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांनी पदवी प्राप्त केली.

    1) ग्वाल्हेर राजघराण्यातील राजकन्या आणि धौलपूर राजघराण्याची सून, पाच वेळा आमदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या वसुंधरा राजे यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणजे पाच जातींसोबत असलेला त्यांचा थेट संपर्क.

    2) त्या स्वतः मराठा राजपूत आहेत. जाट राजघराण्यात त्यांचं लग्न झालं आहे. त्यांच्या पतीचा जन्म शीख राजघराण्यात झाला होता आणि जाट राजघराण्यातील आजोबांनी त्यांना दत्तक घेतलं.

    त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे यांना या सगळ्यांचं समर्थन मिळवून आपलं स्थान भक्कम करण्याची संधी मिळाली.

    वसुंधरा राजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री आणि कार्मिक मंत्रालयाच्या मंत्री म्हणून काम केलं होतं.

    2003 साली राजस्थानच्या रणांगणात त्यांना उतरवण्यात आलं, तेव्हा वसुंधरा यांनी भाजपच्या ‘उदास आणि कलह माजलेल्या’ राजकीय स्थितीतही 200 पैकी 120 जागा जिंकून इतिहास रचला.

    3) त्यापूर्वी भाजपला कधीही राजस्थानच्या राजकारणात बहुमत आणता आलं नव्हतं.

    1977 मध्ये जनता पक्षाने 152 जागा जिंकल्या तेव्हा पक्षाचे नेते भैरोसिंग शेखावत हे कसेबसे मुख्यमंत्री बनले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 95 चा आकडाही पार करता आला नाही.

    वसुंधरा राजे यांच्या आधी भाजपच्या भैरोसिंह शेखावत आणि इतर नेत्यांच्या कारकिर्दीत राजस्थान विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर एकदा नजर टाका.

    4) शेखावत तीन वेळा मुख्यमंत्री झाले. एकदा जनता पक्षाच्या काळात 152 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर, भाजपचे नेते म्हणून ते दोनदा मुख्यमंत्री झाले.

    1990 मध्ये ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा भाजपला 85 जागा मिळाल्या होत्या. 1993 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपला 95 जागा मिळाल्या होत्या.

    त्यावेळी बहुमतासाठी 101 जागा आवश्यक होत्या.

    5) वसुंधरा राजेही दोन वेळा भाजपकडून राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. 2003 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली 120 जागा निवडून आल्या आणि 2013 मध्ये त्यांनी 163 जागा मिळवून विक्रम रचला.

    पण 2013 साली एवढ्या जागा मिळण्यामागे त्यावेळची मोदी लाटही कारणीभूत होती, असं काही राजकीय तज्ञ म्हणतात.

    त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विविध भागात जाहीर सभा घेतल्या होत्या. या सभांना प्रचंड गर्दी होती.

    त्या निवडणुकीत वसुंधरा राजे यांनी तत्कालीन गेहलोत सरकारविरोधात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात भाजप नेते भूपेंद्र यादव त्यांच्यासोबत होते असंही तज्ञ सांगतात.

    6) खरं तर पाच वर्षांपूर्वीच बदलाचे संकेत मिळाले होते. त्यावेळी वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेतून पायउतार होऊन अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं होतं.

    काही दिवसांनंतर म्हणजेच 10 जानेवारी 2019 रोजी वसुंधरा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीममध्ये उपाध्यक्षपद दिलं गेलं. त्यामुळे त्यांना राजस्थानात विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही हे तर निश्चित झालं होतं.

    त्याऐवजी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया विरोधी पक्षनेते झाले.

    कटारिया यांची नंतर आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या जागी राजेंद्रसिंह राठोड हे विरोधी पक्षनेते बनले. याआधी सी पी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं.संपूर्ण लेख वाचा- 'मेरी डोली राजस्थान आई थी, अब अर्थी ही जाएगी'

  18. तीन राज्य गमावली, पण तेलंगणा जिंकल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

  19. दानिश कनेरियानं विचारलं, पनौती कोन?

    पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया यानं भारतात 3 राज्यांत भाजपाला मोठी आघाडी मिळाल्यानंतर विरोधीपक्षांवर टीका केली आहे.

    सोशल मीडिया साईट एक्सवर त्याने एक ट्वीट केलं आहे आणि फक्त पनौती कोण असा प्रश्न विचारला आहे.राहुल गांधी यांनी एका भाषणात पनौती शब्दाचा उल्लेख केला होता त्यासंदर्भात हे ट्वीट असावे असं मानलं जातंय.

  20. अशोक गहलोत राजकारणात कसे आले? वाचा-

    काँग्रेसने राजस्थानातील निवडणूक अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार भारतीय जनता पार्टीला राजस्थानमध्ये मोठं यश मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गहलोत यांच्या कारकिर्दीकडे एक नजर टाकू....आजपासून 50 वर्षांपूर्वी जोधपूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा गावातलं, पीपाडमधलं, दृश्य, एक 20-22 वर्षांच्या तरुणाने लहानशा दुकानावर खतं आणि बियाणं विकायला सुरुवात केली.

    अत्यंत नम्र असणारा हा मुलगा सायकलवर भरल्लेया पिशव्या लादून घंटी वाजवत जायचा.

    हरितक्रांतीची सुरुवात झाली होती. त्याकाळात खतं आणि बियाण्यांची दुकानं मारवाड प्रांतातही सुरु झाली. या युवकानेही दुकान सुरु केलं. ग्राहकांची वाट पाहात दोन्ही हातांवर हनुवटी टेकवून अनेकदा हा मुलगा गहन विचारात गढलेला आढळायचा.

    तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की हा मुलगा राजस्थानच्या राजकारणाचा प्रमुख चेहरा बनेल.

    पीपाड, बूचकला, जाटिसाबास, बंकालिया, सिंधीपुरासारख्या गावात राहाणारे आणि नव्वदीच्या आसपास असणारे अनेक वृद्ध राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे किस्से सांगतात.

    गहलोत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात म्हटलं, “मी स्वतः पीपाड गावात 50 वर्षांपूर्वी खतं आणि बियाण्यांचं दुकान सुरू केलं होतं. आज जनतेच्या आशीर्वादाने या जागी पोचलो आहे. आज पीपाडमध्ये परत आल्यानंतरही पुन्हा तेच प्रेम मिळालं आहे. हीच माझ्या जीवनाची कमाई आहे.”

    पण त्यांची कमाई फक्त एवढीच नाही. जयपूरशी प्रत्येक बाबतीत फटकून वागणाऱ्या जोधपूरच्या सरदारपुरा भागात गेलात तर तुम्हाला भाजपचेही असे काही समर्थक सापडतील ज्यांची इच्छा आहे की गहलोत यांचा विजय व्हावा.

    कारण? ते मुख्यमंत्री झाले तर जोधपूरसाठी बरंच काही करू शकतील.

    राजस्थानच्या राजकारणात पूर्व आणि पश्चिम भागाला जोडून ठेवण्याचं अवघड काम गहलोत यांनी केलं त्यामुळेच त्यांना ‘जादूगार’ म्हणतात.

    मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली तेव्हा त्यांनी आपल्यासाठी सरदारपुराची जागा निवडली.अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिककरून संपूर्ण लेख नक्की वाचा- राजस्थानचे जादूगार अशोक गहलोत