'शक्तीपीठ महामार्गा'बद्दल एकनाथ शिंदे म्हणाले...
- लोकांच्या सहमतीशिवाय शक्तीपीठ महामार्ग होणार नाही.
- महामार्ग झाला तर लोकांचाच फायदा होईल. हे सगळं लोकांसाठीच सुरु आहे. त्यांच्या सहमतीशिवाय करणार नाही.
- समृद्धी महामार्गाला असाच विरोध होता. मात्र, नंतर लोकांना जेव्हा कळलं की हा आपल्या फायद्याचा आहे, तेव्हा लोकांनी सहमती दिली.

राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण उद्योगांना मारक नाहीये का, या प्रश्नावर ते म्हणाले...
- लोकसभेआधी कुणी ध्रुवीकरण केलं? कुणी विरोधात बोलला तर त्या पत्रकारालाही अटकेत टाकलं.
- केतकी चितळे, कंगणा रणौत, नारायण राणे या सगळ्या प्रकरणात काय झालं?
- अंबानींच्या घराखाली जिलेटीन कुणी ठेवलं?
- वातावरण दुषित ठेवण्याचं काम विरोधक जाणीवपूर्वक करत आहेत.
- आम्हाला महाराष्ट्र शांतच हवा आहे. हे पुरोगामी राज्य आहे. आम्हाला वातावरण दुषित करायचं नाही.
- त्यामुळे, नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्यात मुख्यमंत्री आणि मी स्वत: जातीनं लक्ष घालत होतो.
- आम्ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहोत.
- हे उद्योग-स्नेही राज्य आहे. त्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते आम्ही करु.




















