अन्न टंचाई आणि औषधांच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानने मागितली आंतरराष्ट्रीय मदत
पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत किमान हजार लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागावी लागली आहे.
अन्न टंचाई आणि अपुऱ्या औषधांच्या साठ्यामुळे मृत्यू आणखी वाढतील असा अंदाज आहे. पूरस्थिती इतकी भयानक आहे की, लोकांना आपल्या वस्तू तिथंच सोडून घरं सोडावी लागत आहेत.
कित्येक हेक्टर शेतीही पाण्याखाली गेलीय. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पूरस्थिती लवकर आटोक्यात येणारी नाही. पुम्झा फिहलानी यांचा रिपोर्ट…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)