You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा आणून काय साध्य होणार?
राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा आणून काय साध्य होणार?
महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' विरोधी एक कायदा येणार असल्याची चर्चा सुरूये. कारण गृह विभागाने नुकतंच एक शासन निर्णय जारी करत विशेष समिती स्थापन केली आहे.
या निर्णयानुसार, बळजबरीनं धर्मांतर किंवा फसवणूक आणि 'लव्ह जिहाद' या अनुषंगानं ही समिती कायदेशीर अभ्यास करणार आहे.
अशीच एक समिती युती सरकारने डिसेंबर 2022 मध्ये स्थापन केली होती. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 'आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती' स्थापन करण्यात आली होती.
निवेदन - गुलशनकुमार वनकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)